yuva MAharashtra Founder-Desk

Founder-Desk

 


|| मिरज सुधार समिती ||

सुमारे १४०० वर्षाचा इतिहास असलेले महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील अत्यंत महत्वाचे  शहर म्हणून मिरज शहराचा उल्लेख केला जातो.  मिरज रेल्वे जंक्शन, वैद्यकीय पंढरी, संगीताचे माहेरघर, हजरत मिरासाहेब दर्गा, ऐतिहासिक श्री गणेश मंदिर, जेष्ठ कलाकार बालगंधर्वांची जन्मभूमी, संगीतकार ख्वॉ अब्दुलकरीम ख्वॉंची कर्मभूमी असे वैशिष्ट्य असलेले मिरज शहराचा तत्कालीन मिरज नगरपालिका असो किंवा आताची सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका असो मिरज शहर हे विकासापासून वंचितच राहिला आहे.  

याला एकमेव कारणीभूत ते म्हणजे, मिरजेतील काही घराण्याची राजकारणातील  मक्तेदारी आणि आपल्याच भाकरीवर लोणी या प्रवृत्त्तीमुळे मिरज शहर हे विकासाबाबतीत मागासच राहिले. याची जाणीव होऊन मिरज शहरातील तरूण सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. अल्लाबक्ष काझी उर्फ ए. ए. काझी यांनी मिरज शहरातील धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारसरणीचे, सामाजिक चळवळीची जाण असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून  ’’लढा आपल्या हक्कासाठी...’’  हा ब्रिद घेऊन  भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी म्हणजे २६ जानेवारी २००५ साली मिरज सुधार समिती या नावाने सामाजिक चळवळ सुरू केली.

मिरज सुधार समितीचे संस्थापक असलेले अ‍ॅड. ए. ए. काझी (काका)  यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती या मिरज सुधार समिती चळवळ मिरज शहरात सुरू केली. अ‍ॅड. काझी हे रिक्षाचालक असतानाच मिरज सुधार समितीची मोठ बांधली गेली. मिरजेत प्रस्थापितांविरोधात लढा देताना अ‍ॅड. काझी यांना स्वत:च्या घरातूनच नगरसेवक असलेले त्यांचे चुलते आािण मावस भावाची नाराजी सुध्दा पत्कारावी लागली.  मात्र, अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी भावकीची नाराजीला न जुमानता मिरज शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी मिरज सुधार समितीचा लढा सुरूच ठेवले.

अ‍ॅड. ए. ए. काझी यांची वैयक्तीक आयुष्य खडतरच राहिले आहे. सुरूवातीला तत्कालीन मिरज नगरपालिका असताना जकात नाक्यावर कर्मचारी, मिरज औद्योगिक वसाहतीत पॅकेजिंग कंपनीत हेल्पर, त्यानंतर रिक्षाचालक, मिरज रेल्वे जंक्शनवर दुचाकी वाहनतळाचा ठेकेदाराबरोबरच दैनिक तरूण भारत, पुण्यनगरी, प्रतिध्वनी अशा विविध दैनिकांत पत्रकार अशा विविध भुमिकेत अ‍ॅड. काझी यांचा जीवन प्रवास राहिला.  

सामाजिक चळवळ चालविताना सर्वसामान्यांना येणारी कायदेशीर बाबींची अडचण लक्षात घेऊन आपणच वकिल झालेलं बरं या इराद्यातून अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी मुंबई विद्यापीठातून वकिली शिक्षण पुर्ण केले.  स्वत: रिक्षाचालक तसेच, अनेक वर्षे मिरज रेल्वे जंक्शनवर दुचाकी वाहनतळ ठेकेदार, पत्रकार, वकील म्हणून काम केले असल्याने अ‍ॅड. ए. ए. काझी यांना मिरज शहर व ग्रामीण भागातील सामाजिक विषय, सर्वसामान्यांच्या अडचणी तसेच रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांची जाण असल्याने अ‍ॅड. ए. ए. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज सुधार समिती आणि रेल्वे प्रवासी संघ,मिरज या दोन्ही संघटना जनतेच्या सेवेसाठी अखंडितपणे कार्यरत आहेत.