yuva MAharashtra ◆ मिरजेत जन्म-मृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरुच ◆ एकाच कार्यालयात तीन ठिकाणी मारावे लागत आहेत हेलपाटे ◆ मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यां नी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

◆ मिरजेत जन्म-मृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरुच ◆ एकाच कार्यालयात तीन ठिकाणी मारावे लागत आहेत हेलपाटे ◆ मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यां नी अधिकाऱ्यांना धरले धारेवर





◆ मिरजेत जन्म-मृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरुच

◆ एकाच कार्यालयात तीन ठिकाणी मारावे लागत आहेत हेलपाटे

◆ मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यां नी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

_________________________

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील जन्म – मृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे. कार्यालयात दाखले देण्यासाठी तीन-तीन ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरीक मेटाकुटीस आले आहेत. कर्मचारी संख्या वाढवूनही कारभारात सुधारणा होत नसल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मिरज शहर हे वैद्यकीय शहर आहे. दररोज अनेक रूग्ण उपचारासाठी मिरजेत येतात. त्यामुळे मिरज शहरात जन्म व मृत्यूची नोंंद अधिक होत असते. महोदय, जन्म व मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात.

महापालिकेने ऑनलाईन दाखले बंद केले आहेत. दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात   कर्नाटक, गोवा, कोकणसह अन्य  भागातून दररोज शेकडो नागरीक   मिरजेला येतात. जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालकांची दाखल्यांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत आहे. मात्र, महापालिकेत दाखले वितरीत करण्याबाबत कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. सहा-सहा महिन्यांपर्वूी दिलेल्या अर्जाचे सुध्दा निर्गती होत नसल्याने जन्म – मूत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती. याची दखल घेत जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढविली. तरीही, एकाच कार्यालयात तीन-तीन ठिकाणी दाखल वितरीत करण्याचे काम होत असल्याने वर-खाली हेलपाटे मारून नागरिक मेटाकुटीस आले आहेत.

म्हणून गुरूवारी मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, उपाध्यक्ष संतोष जेडगे, कार्यवाह असिफ निपाणीकर, अफजल बुजरूक, नरेश सातपुते, अभिजीत दाणेकर, वसीम सय्यद आदी सदस्यांनी जन्मू –मृत्यू विभागातील अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब विचारत कामात सुसुत्रता आणण्याची मागणी केली.