🔴 देश महासत्ता होण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग आवश्यक - किशोर पटवर्धन
🔴 किसान चौकात मिरज सुधार समितीच्या वतीने ध्वजारोहन
-------------------------------------------------
समाजकारण आणि राजकारणात सुशिक्षित तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे. या तरुणाईच्या जोरावरच देशाचे महासत्ताचे स्वप्न साकार होणार असल्याचे मत प्रणव बिल्डकाँनचे संचालक किशोर पटवर्धन यांनी व्यक्त केले. किसान चौकात मिरज सुधार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
७९व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक किसान चौक, लक्ष्मी मार्केट, मिरज येथे मिरज सुधार समितीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रम मा. किशोरजी पटवर्धन, डॉ. शशिकांत दोरकर सर, विलास (दाजी) देसाई, ऍड. इर्शाद पालेगार सर, तालुका सरकारी वकील ऍड. कविता पालेगार मॅडम, रवी अटक, किरण भुजगडे, इम्रान निवडे, दत्तात्रय हेटकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मिरज सुधार समितीचे संस्थापक ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, जेष्ठ सदस्य रामलिंग गुगरी, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, सलीम खतीब, वसीम सय्यद, शब्बीर बेंगलोरे, सुभान सौदागर, संदीप हंकारे, जावेद शरीकमसलत, अझीम बागवान, अमीर डांगे, इंजिनिअर शिराज शेख, रमीझ हंगड, शमशोद्दीन देवगिरी, सब्बार डबीर आदीसह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय हिंद...🇮🇳🤝✊




