यांची अक्कल शेण खायला गेली आहे का...? 😡😡
एकीकडे मुस्लिम समाजाकडून गोमातेला राष्ट्रीय पशु जाहीर करण्याची कौतुकास्पद मागणी जोर धरत असताना दुसरीकडे मिरजेतील बेपारी गल्लीत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने गो हत्या केली जात असेल तर हे साफ चुकीचे आहे. इतक्या मोठया प्रमाणात जनावरे वासरू आणून गो हत्या करणाऱ्यांची अक्कल शेण खायला गेली आहे का...? असा संतप्त सवाल शांतता प्रिय मिरजकरांतून व्यक्त होत आहे. गो हत्या करून मिरजेतील सामाजिक वातावरण दूषित करणाऱ्ऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे...तसेच, बेपारी गल्लीत जनावरांची होणारी बेकायदेशीर कत्तल आणि यातून निर्माण होणारा आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने पोलीस आणि महापालिका प्रशासनाने कोणताही राजकीय दबाव न जुमानता या बेकायदेशीर कत्तलीला आळा घालायला हवा...यासाठी मिरज सुधार समिती निर्भीडपणे पाठपुरावा करणार...मिरज शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल अभिनंदन आणि आभार..🤝🙏
